नांदेड :- (माधव मेकेवाड) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहिर सभा आज नांदेड येथे झाली. ही सभा नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी थेट नांदेड येथे दि १५ एप्रिल २०१९ रोजी आले होते. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि शेतीविषयक धोरणांवर जोरदार टीका केली. ”मोदींनी गब्बरसिंग टॅक्स लावला, अर्थव्यवस्था कोलमडली, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, मोदींनी जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली,” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार आणि शेतीला हमीभाव देण्याचा आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात फसवणूक झाली, अशी टीका राहुल गांधींनी केली.
पाच वर्षांपासून मोदी सरकार चालवत आहे त्या नोट बंदीमुळे अनेक छोटे व्यापारी नष्ट झाले, मोदींनी २ करोड युवकांना नोकरी देण्याचा वादा त्यांनी पूर्ण केला नाही त्यामुळे त्यांच्या वर टीका केली. १५ लक्ष रुपये बँकेत आपल्या खात्यात पैसे टाकण्याचा वायदा त्यांनी पूर्ण केला नाही, मोदीने ३० हजार करोड रुपये डायरेक्ट अनिल अंबानी यांच्या खिशात टाकले, पार्लमेंट हाऊस मध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदीला प्रश्न विचारले की राफेल हवाई जहाज भारत देशात का बनवलं नाहीत, तेव्हा त्याच उत्तर त्यांनी दीड तास देण्यास लागले. कहते मेरे भाई यो और बहनो, अच्छे दिन आयएंगे असे म्हणून मोदी जनतेला फसवले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ३ लाख ५० हजार करोड रुपये त्यांनी माफ केले, अनिल अंबानी, विजय माल्या, निरव मोदी यांना अटक केली जात नाही. अशी टीका टिपणी राहुल गांधी यांनी या सभेवेळी केली.