कोलकाता वृत्तसंस्था – भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोडशो दरम्यान चांगलाच राडा झाला होता त्यावर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्यावर हल्लबोल केला आहे ‘अमित शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का? अशी प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी दिली आहे. कोलकातामध्ये अमितशाहांच्या रोडशोदरम्यान झालेल्या हिंसाचारची ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली .
ममता बॅनर्जी यांनी झालेल्या प्रकरणासंदर्भात विद्यासागर कॉलेजचा दौरा केला त्यावर बॅनर्जी म्हणाल्या की, “अमित शाह स्वत:ला काय समजतात? ते सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत का? त्यांच्याविरोधात आंदोलन न करायला ते काय देव आहेत का? आंदोलक एवढे असभ्य आहेत की, त्यांनी समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळाही तोडला. आंदोलन करणारे लोक ही भाजपने बाहेरून आणली होती आणि बरोबर मतदानाच्या दिवसासाठी आणली होती असा आरोप ममतांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या येथील रोड शोवेळी मंगळवारी तुफान राडा झाला. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही.