बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधींनी भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करणार असल्याची चर्चा होती. मात्र या विलीनीकरणाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कडाडून विरोध केल्याचे समोर आले आहे.
आज मुंबईत राष्ट्रवादीची चिंतन बैठक पार पडली. त्यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येऊ नये असं ठासून सांगितलं. पक्षाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. हे अस्तित्व पक्ष कायम ठेवेल. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडू नये. असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
या बैठकित शरद पवारांनी लोकसभा पराभवानंतर लोकसभा उमेदवारांशी वन टू वन चर्चा करत माहिती घेतली. तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे फॅक्टरबद्दलही नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जास्त जागा जागा मागण्याची तयारी सुरु आहे.