नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या पगारात मोठी वाढ अर्थसंकल्पानंतर होण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थसंकल्प 2020 सादर करण्यात येणार आहे. यानंतर ही वाढ अपेक्षित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रसरकार महागाई भत्त्यात (DA) सुमारे 4 टक्के वाढ करू शकते. याचा लाभ केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होऊ शकतो.
केंद्र सरकारने डीएमध्ये वाढ केल्याने सुमारे 1.1 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार केंद्र सरकार कर्मचार्यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ करू शकते. ज्यामुळे सध्याच्या 17 टक्के डीएमध्ये वाढ होऊन तो 21 टक्के होऊ शकतो.
नोव्हेंबरच्या मुल्य निर्देशांकाने (CPI) 328 ची पातळी गाठली आहे. आता डीएमध्ये 4 टक्क्यांची कपात होऊ शकते जर मुल्य निर्देशांकात 12 टक्क्यांनी वाढ झाली तर, पण हे सध्याची स्थिती पाहता शक्य दिसत नाही, असे हृषिशंकर तिवारी, माजी अध्यक्ष, एजी ब्रदरहुड यांनी सांगितले. केंद्र सरकार मार्च 2020 मध्ये डीएची घोषणा करू शकते, असेही ते म्हणाले. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचा डीए 17 टक्के आहे आणि 4 टक्के डीए वाढीच्या घोषणेनंतर तो 21 टक्के होईल. तिवारी म्हणाले, डीएच्या वाढीच्या घोषणेनंतर केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या प्रवास भत्त्यात (TA) सुद्धा तेवढ्याच टक्क्यांची वाढ होऊ शकते.
श्रेणी 1 साठी – केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना मुळ वेतन 18000 रूपये आहे. तर कॅबिनेट सचिवांच्या पातळीवरील कर्मचार्यांचे मुळ वेतन 2.5 लाख आहे.
डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यास श्रेणी 1 मधील कर्मचार्यांना किमान वाढ 270 रूपये ते 10000 रूपये मिळणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वे कर्मचार्यांच्या वेतनामध्ये 5000 ते 21000 रूपयांची वाढ होऊ शकते.
जानेवारी 2019 मध्ये सरकारने सरकारी कर्मचार्यांच्या डीएमध्ये 3 टक्के वाढ केली होती. तर गुजरात सरकारने त्यांच्या राज्य सरकारी कर्मचार्यांचा डीए 5 टक्क्यांनी वाढविला होता.
अर्थमंत्री निर्मला सितारमन येत्या 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 संसदेत सादर करणार आहेत.