बहुजननामा ऑनलाइन टीम : ‘अजित पवार यांच्या सोबतीने भाजपाने स्थापन केलेल्या सरकारविरोधात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल आमच्या विरोधात जाईल असे आम्हाला वाटले नव्हते. हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता.’ असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालानंतर अजित पवार यांनी तुमची सोबत सोडली का असा सवाल फडणवीस यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘त्या निकालामुळे अजित पवारांनी माघार घेतली का हे अजित पवारच सांगू शकतील.’
फडणवीस पुढे म्हणाले की, ‘विधानसेभेचे नियम हे संविधानाच्या अंतर्गत बनलेले नियम आहेत. त्यामुळे ते संविधानाने आणि घटनेचे आखून दिलेले नियम आहेत. म्हणूनच रुल्स ऑफ बिझनेस म्हणजेच कार्यभार सांभळण्याच्या नियमांप्रमाणे कारभार सुरु ठेवावा, अशी आम्हाला अपेक्षा होती मात्र, जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो आम्हाला अपेक्षित नव्हता पण ठिक आहे, न्यायालयाने जो निकाल दिला तो आम्ही मान्य केला.’ अजित पवार यांनी अचानक भाजपाची साथ का सोडली या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘ निकालामुळे अजित पवारांनी माघार घेतली का हे अजित पवारच सांगू शकतील,. पण माझ्या वैयक्तीक कारणांमुळे मला आता तुमच्यासोबत राहता येत नाही. या कारणांमुळेच मी परत जात आहे. असे त्यांनी सांगितले. अजित पवारांबरोबरच्या सत्तास्थापनेसंदर्भात पडद्यामागे आणि इन बिटवीन द लाइन्स अनेक गोष्टी आहे.
त्या मी योग्यवेळ आल्यावर नक्की सांगेनच’ फडणवीस यांनी अजित पवार यांनी सोबत घेऊन सत्ता स्थापन केलेले सरकार घटनाबाह्य असल्याची याचिका तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायलयामध्ये दाखल केली होती. त्यानंतर 25 नोहेंबर रोजी न्यायालयाने दोन्ही बाजू एकून घेतल्या. 26 नोहेंबर रोजी न्यायालयाने राज्यामध्ये बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय दिला. ही बहुमत चाचणी गुप्त पद्धतीने घेतली जाऊ नये, सर्व मतदानाचे व्हिडिओ रेकॉर्डींग करावे असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. या निकालानंतर अजित पवारांनी लगेचच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांमध्येच फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्याकडे बहुमत नसल्याने मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते.
Visit : bahujannama.com