कोपरगाव : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर एकमेकांवर टोकाचे आरोप -प्रत्यारोप होताना आपणाला बघायला मिळतात त्याच पार्श्वभूमीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.महाराष्ट्रात एकीकडे भाजप-शिवसेनेची महायुती पक्की आहे. तर दुसरीकडे म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेसची आघाडी आहे, अशी टीका यांनी केली.
महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत गुरुवारी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, सर्वत्र भगवी लाट आहे. महायुतीसमोर कुठलेही चिन्ह उभे नाही. केंद्रात पंतप्रधान मोदी यांचेच सरकार पुन्हा येणार आहे. काँग्रेसने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र यात भांडणे लावली अशी कामे युती कधीच करत नाही .राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर देश कार्टून नेटवर्क होईल.आमचे सरकार सत्तेत आल्यास ३७० कलम ठेवू. परंतु ते ठेवले तर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत राहतील असेही ते म्हणाले .