पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेनंतर राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी करत आहेत. त्यात भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असून त्यावर राष्ट्रावादीने त्यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीतून अनेकांची एक्झिट होत आहे, त्यामुळे त्यावरून त्यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केले. सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सहकारी संस्थांसह बँकांचा गैरवापर होत आहे. तसंच काही नेते सोडून गेल्याने आम्हाला फरक पडत नाही. मी याआधीही अशी परिस्थिती पाहीली आहे. यातून कसा मार्ग काढायचा याची आम्हाला कल्पना आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.
यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे मांडले.
१. पंढरपूरच्या कल्याणराव काळे यांना दबाव टाकून पद्धतीने पक्षांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी यावेळी आहे.
२. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सत्ताधाऱ्यांनी विनाकारण तुरुंगात टाकले.
३. भाजप विरोधाकांना धमकावून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
४. दौंडच्या राहुल कुल यांनाही याच पद्धतीने सुप्रियाविरोधात लोकसभा निवडणुकीत उभं राहण्यास भाग पाडलं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
५. हसन मुश्रीफ यांनी पक्षांतराला नकार दिला म्हणूनच त्यांच्या घरावर छापे घातले, तर चित्रा वाघ यांनीही माझ्याकडे कबुली देत सांगितले की माझ्या पतीच्या विरोधात केसेस आहेत. त्या सोडवण्याच्या बदल्यात मला पक्षांतर करावं लागत आहे, असं पवार यांनी यावेळी सांगितलं.