मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर गेल्या 11 दिवसांपासून सरकार स्थापन करण्याला घेऊन ओढाताण होताना दिसत आहे. अशातच मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं वक्तव्य केलं आहे. आतापर्यंत विरोधी पक्षनेता होणाबाबत भाष्य करणाऱ्या राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेनेसमोर सरकार स्थापन करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, “जर शिवसेना आमच्याशी युती करत सरकार स्थापन करणार असेल तर पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री त्यांचा असेल. आम्हाला मुख्यमंत्री पद नको आहे. उपमुख्यमंत्री पदंही दोन असतील. त्यातही एक शिवसेनेचाच असेल. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शिवसेना भाजपसोबत असलेली युती तोडेल.”
‘काँग्रेस देईल बाहेरून पाठिंबा’
राष्ट्रवादीच्या नेत्यानुसार, केंद्रातील मोदी सरकारमधील शिवसेनेच्या एकमेव मंत्र्याने जर राजीनामा दिला तर राष्ट्रावादी युतीसाठी विचार करू शकते. अशात महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना त्यांना काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा मिळेल.
‘जर शरद पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर…’
राष्ट्रवादीचे नेते म्हणाले, “जर शिवसेना आमच्याशी युती करत सरकार स्थापन करणार असेल तर पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री त्यांचा असेल. आम्ही मुख्यमंत्री पद नको आहे. उपमुख्यमंत्री पदंही दोन असतील. त्यातही एक शिवसेनेचाच असेल. परंतु जर या स्थितीत बदल झाला आणि पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर यात बदल केला जाईल. परंतु सद्य स्थिती पाहता असे काहीच होताना दिसत नाही. परंतु आम्ही मंत्रिमंडळातील काही महत्त्वाच्या पदांची नक्कीच मागणी करू.”
राम मंदिराच्या मद्द्याचा परिणाम नाही
राष्ट्रवादीचे नेते म्हणाले आहेत की, “या गोष्टीवर अयोध्येतील राम मंदिराच्या वादाचा कोणताही प्रभाव पडणार नाही. कारण राष्ट्रवादीने आधीच म्हटले आहे की, कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे या प्रकरणाचा सरकार बनवण्यावर किंवा युतीवर कोणताही परिणाम होणार नाही.” दरम्यान राष्ट्रवादीच्या या प्रस्तावावर शिवसेनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.