बहुजननामा ऑनलाईन टीम : भाजपाचे काही आमदार स्वगृही म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक असून आम्ही फोडाफोडी केली तर अख्ख भाजप रिकामं होईल असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांनी केला आहे. विधानभवनामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. “भाजपा आपल्याकडे ११९ आमदार असल्याचा दावा करत आहे. पण आज तशी परिस्थिती नाही,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक म्हणाले की, ‘भाजपाने आव्हान स्वीकारले पाहिजे. आधी आपले ११९ आमदार दाखवा आणि मग धमक्या द्या. भाजपामध्ये असे अनेक आमदार आहे ज्यांना अमिष दाखवून नेले आता सत्ता नाही म्हणून ते अस्वस्थ झाले आहे. आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही. पण जरी हे केले तर अख्ख भाजप रिकामं होईल हे त्यांना कळाले पाहीजे.’ महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर याविरोधात राज्यपालांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही यावेळी मिळाली. यावर नवाब मलिक यांनी उत्तर दिले की, भाजपा शपथेवर आरोप करत आहे. परंतु, तसे झाले तर संसद रिकामी करावी लागले असा टोला त्यांनी लगावला.
‘अधिक नावं घेण्याची प्रथा भाजपानंच सुरू केली. हे बेकायदेशीर असलं असं म्हटलं तर लोकसभा बर्खास्त होईल. त्यांनी आधी स्वत:कडे पाहाव नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवावं,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ‘महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील त्यांना अनेकदा टोकले. शपथविधीची एक पद्धत असते आणि त्यापद्धतीने ती घ्यावी लागते. परंतु, नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनूसार शपथ घेण्यात आली नाही.’ असे चंद्रकात पाटील यांनी म्हंटले आहे. याविरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते, असं ते म्हणाले.
Visit : bahujannama.com