नवी दिल्ली : वृत्तसंस्था- नुकत्याच भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसलेंवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोचरी टीका केली आहे. उदयनराजे भोसले यांच्या बालिश चाळ्यांना शरद पवार यांनी नेहमीच पाठीशी घातले असे आव्हाड यांनी म्हटले. पवारांचा त्यांच्यावर जीव होता परंतु उदयनराजेंनी पवारांना काय दिले ? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत उदयनराजेंवर निशाणा साधला. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “साहेब उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केले सताऱ्यातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घातलत पोटच्या पोरावणी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले ? पण तरीही “यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरदपवारांचा बालेकिल्ला.”असे आव्हाड म्हणाले.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1172724032950521856
उदयनराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. यासाठी ते लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी गेले होते. अमित शहा, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीज महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले.
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.@AmitShah, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष @JPNadda, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, केंद्रीय मंत्री @RamdasAthawale, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, मंत्री गिरीश महाजन या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश. pic.twitter.com/UcmhfwWl3v
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 14, 2019
भाजपप्रवेशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना उदयनराजे म्हणाले, “लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेनं मी हे पाऊल उचललं आहे. मोदी-शहा देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत. त्याचबरोबर लोकशाही त्यांनी मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे.”