पुणे बहुजननामा ऑनलाईन – ईव्हीएमबाबत शरद पवार यांचं मत वेगळं, अजित पवार यांचं मत वेगळं, सुप्रिया सुळे यांचं मत वेगळं असा संभ्रम मिडीयाने निर्माण केला. मात्र लोकशाहीत बहुसंख्य लोकांचे मत महत्त्वाचे आहे. विधानसभेच्या निवडणूका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात असं माझं मत आहे. अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. तर ईव्हीएमबाबत मिडीयावर खापर फोडलं. पुणे शहर कार्यकारिणीच्या बैठकित ते बोलत होते.
निवडणूकीत २८८ पैकी १४५ खासदार निवडून आले तर ज्या त्या पक्षाने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे ठरवावं. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे असतील की अजून कोणी याबाबत मी त्यात नाक खुपसणार नाही. निवडून येण्यासाठी माणसं फोडली जातात. गोवा झालं, आता कर्नाटक गेल्यात जमा आहे. त्यानंतर मध्यप्रदेश राजस्थानचा नंबर असेल. असंही ते म्हणाले.
नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी वाढली. माथाडी संघटनांची दहशत आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी पिंपरी चिंचवडमधून काढता पाय घेतला आहे. या सगळ्या कंपन्या आम्ही आणल्या. गुतंवणूक आम्ही आणली. परंतु आता दहशतीमुळे गुंडगिरीमुळे परदेशी कंपन्या निघून जात आहेत. असे अजित पवार म्हणाले. सत्तेत मोर्चा काढून बनवाबनवी केली जात आहेत. लोकांना मुर्ख बनविण्याचे काम सुरु आहे.
राष्ट्रवादीमुक्त पश्चिम महाराष्ट्रला राष्ट्रवादीमय पश्चिम महाराष्ट्रने उत्तर देऊ असेही ते म्हणले. टोलमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा देत २०१४ मध्ये भाजप सत्तेत आले परंतु सत्तेत आल्यानंतर टोल भरावाच लागेल असं गडकरी म्हणतात. असा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे चाकण हिंसाचार प्रकरणी सरकार राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना टार्गेट करत असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आक्रमक भुमिका त्यांनी घेतली आहे.