मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात ऐतिहासिक आघाडीचा प्रयोग करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. देशभरात चौफेर उधळत असलेला भाजपचा वारू देशभरात उसळत होता परंतु महाराष्ट्रात तो रोखला गेला. पवारांच्या या खेळीनं देशाचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर आता पवार देशभर हा प्रयोग करण्यास उत्सुक असल्याचं दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे गेल्या काही वर्षात देशात विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. मोदी सरकारने घेतलेले नोटबंदी आणि जीएसटीसारखे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. मात्र हे मुद्दे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरले. मात्र हे मुद्दे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरले. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. त्यामुळे मोदींचा पराभव करायचा असल्यास काय करायला हवं, याविषयी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शरद पवार यांनी भाष्य केलं होतं.
पुढे पवार म्हणाले, “जोपर्यंत मोदींना पर्याय उभा केला जात नाही तोपर्यंत बदल घडणार नाही. मोदींपेक्षा हा नेता उजवा आहे, काहीतरी करून दाखवणारा आहे हे जोपर्यंत ठळकपणे दिसत नाही तोपर्यंत लोक तो पर्याय स्विकारणार नाही. असा पर्याय उभा करण्यात विरोधकांना यश आलं नाही. पर्याय निर्माण केला तर त्याला पाठिंबा मिळतो हे मी अनुभवलं आहे.” असेही त्यांनी सांगितले. स्वत: शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी या आशयाचा विधान केलं होतं. मात्र अशी मोट बांधण्यासाठी आणि ती यशस्वी करण्यासाठी शरद पवार यांना महाराष्ट्रातच मोठं आव्हान आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा अनोख्या आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालवण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे देशभर जर मोदीविरोधकांना एकत्र आणून नवा पर्याय द्यायचा असल्यास शरद पवार यांना महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेन, याची काळजी घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील प्रयोगाच्या यशावरच देशातील संभाव्य आघाडीचं भवितव्य ठरणार आहे.
Visit : bahujannama.com