बहुजननामा ऑनलाईन टीम – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करत पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला आहे, असे म्हटले आहे. तसेच फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप करत स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याइतके भ्रष्ट सरकार यापूर्वी कधीच सत्तेत आले नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे.
धुळ्यातील भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी डिसेंबरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. महानगरपालिका निवडणुकीनंतर गोटे यांनी भाजपमध्ये असतानाही पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच राष्ट्रवादीमध्ये आल्यावरही त्यांनी फडणवीस यांच्यावर करणारी टीका चालू ठेवली होती.
“फडणवीस सरकारने पाच वर्षात महाराष्ट्र ओरबाडून काढला. मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केले आहे. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय, कागदपत्रांशिवाय बोलत नाही. फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केला आहेत. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारले पाहिजे. शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही,” असे गोटे यांनी म्हटले आहे.
गोटे यांनी समृद्धी महामार्गात घोटाळा झाला असल्याचा आरोप करत ‘मोपलवार त्यांच्याइतका भ्रष्ट माणूस देवेंद्र फडणवीस यांना चालत असेल तर काय बोलायचं? काही सांगायची गरज नाही. प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे, याची यादी माझ्याकडे आहे,’ असे सांगितले.
फडणवीस यांच्या विश्वासघातामुळे आणि त्यांच्या खोटारडेपणामुळे राजीनामा दिला असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. तसेच फडणवीस दिलेला शब्द पाळत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. परंतु ते सगळ्या गुंड, बदमाशांचे साथीदार आहेत हे लक्षात आले. पक्ष सामान्य माणसांचा असतो. आता सगळी राजकारणी आमच्या पक्षात आली असं ते म्हणाले होते. राजघराण्यांसाठी पक्ष चालवता का? शेवटचा गरीब माणूस आपल्या पक्षात राहील असं मी म्हटलं असत. पण त्यांनी राजघराण्याची पडली आहे, अशी टीका गोटे यांनी केली आहे.