बहुजननामा ऑनलाइन टीम : सध्या निवडणुकीचे वारे बदललेले दिसत आहेत. बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेते पक्षांतर करत आहेत. मात्र या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निराशावादी नाही. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सातारा येथे बोलताना म्हणाले, सत्ता ज्याच्या हातात आहे लोक त्याच्या मागे लागतात. आणि निवडणूकीच्या दृष्टीने हे पक्षांतर होत आहेत .या पक्षांतरामूळे राजकीय पक्ष संपत नाही.
सध्या निवडणूक असल्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचे प्रकार सुरु आहेत . यामागे स्वतःचा स्वार्थ दडला आहे. अनेक अडचणीतून पाय काढण्यासाठी हा पक्षांतरचा खेळ चालू आहे. यातूनच कर्नाटकात घोडेबाजार झाले आहे. ते पुढे म्हणाले जो पक्ष किंवा आघाडी १४५ आकडा एकत्रितपणे गाठू शकेल त्यांचेच सरकार महाराष्ट्रात सत्तेत येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या अशा पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर काय परिणाम होईल असे विचारले असता अजित पवार म्हणाले, “याआधी ही शिवसेनेचे १९ आमदार फुटले होते म्हणून काय शिवसेना संपली नाही ना. तर काहींच्या डोक्यात असे विचार चालू आहेत की विविध कारणांसाठी आपली चौकशी होण्याची शक्यता आहे. याभीतीमुळे नेते भाजपमध्ये जात आहेत.
कोणीही पक्ष सोडून गेले म्हणून पक्ष संपत नाही. त्यांच्या जागी बेरीज करताही येते. या अशा बेरजेचे राजकारण यशवंतरावांनीच शिकवले आहे. पाच वर्षापूर्वी आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू हे बहुमताने निवडून आले होते. आता त्याच जागेवर जगमोहन रेड्डी पुन्हा बहुमतात आहेत. असे उदाहरणही यावेळी पवारांनी दिले आहे. अशा या पक्षांतरावर कार्यकर्त्यांनी घाबरून नये. आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या आणि तरूण चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरविले यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या १७५ जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.