मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ईडीचा (ED) ससेमिरा पाठी लावण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.
केंद्रातील सरकार आम्ही ताब्यात घेऊ
देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे, परंतु केंद्रातील सरकार आम्ही ताब्यात घेऊ असा इशारा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला आहे.
हा भाजपचा गैरसमज आहे
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्याहीमागे लावत आहेत. भाजपला वाटतंय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील पण हा भाजपचा गैरसमज असल्याचे मलिक यांनी सांगितले.
फडणवीस ईडीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात
ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान असून प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावयाची याचं मार्गदर्शन (Guidance) ते ईडीच्या अधिकाऱ्यांना करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना ईडीचा ओएसडी (ED OSD) करुन टाका अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचे मलिक यांनी सांगितले.
Web Title :- Nawab Malik | NCP leader nawab malik said devendra fadnavis hand in ed action against mahavikas aghadi leaders
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
PPF मध्ये अशाप्रकारे दुप्पट करू शकता गुंतवणूक, टॅक्स बचतीसह मिळेल चांगला रिटर्न; जाणून घ्या सर्वकाही