मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्लीच्या निकालात तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांनी बाजी मारली आहे. दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकविण्याचे मनसुबे आखणाऱ्या भाजपाला यंदाही पराभवाचा सामना करावाला लागला आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपाले मत मांडले आहे. दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारलं असल्याचा हल्लाबोल मलिक यांनी केला आहे.
धन, बल और छल हार गया
विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करू नका असं आवाहन केलं होतं. दिल्लीच्या जनतेने त्याचं ऐकलं असून भाजपला देशद्रोही घोषित करून टाकलं आहे’, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
मोदी जी ने दिल्ली चुनाव में जनता से अपील की थी के वे एन्टी नॅशनल के खिलाफ मतदान करें,
जनता ने मोदी जी की सलाह मान मतदान कर भाजपा को एन्टी नॅशनल घोषित कर दिया।#DelhiResults #DelhiElectionResults— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 11, 2020
दिल्ली निवडणुकीत भाजपने हजारो कोटी रुपये वाटल्याचा आरोपही मलिक यांनी ट्विटमधून केला आहे. ‘धन, बल और छल हार गया, विकास और विश्वास जीता’, असं ट्विट मलिक यांनी केलं आहे.
धन, बल और छल हार गया,
विकास और विश्वाश जीता.#DelhiResults#DelhiElectionResults@AamAadmiParty— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 11, 2020
दरम्यान, अनेक माध्यमांच्या एक्झिट पोलने देखील अरविंद केजरीवाल यांनाच कौल दिला होता. त्यानुसार आप ला बहुमत मिळाले आहे. तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. दिल्लीत भाजप पराभूत झाल्यानंतर मात्र विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.