नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसची दहशत असून जागतिक आरोग्य संघटनेनुसार आतापर्यंत तब्बल १४९ देशात या व्हायरसचा प्रसार झाला आहे. जगभरात या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ६७०० च्या वर गेली आहे. चीनपेक्षा जास्त खराब परिस्थिती इटलीची झाली असून कोरोनामुळे २४ तासात ३४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकीकडे भारतात आतापर्यंत १२० लोकं कोरोनाने संक्रमित झाली आहेत.आतापर्यंत देशात २ लोकांचा मृत्यू झाला असून आणखी नवीन ४ प्रकरणे समोर आली आहेत. देशात यावेळी कोरोनाच्या १२० प्रकरणांची पुष्टी झाली आहे. पॉजिटीव्ह प्रकरणांच्या ५२०० लोकांची ओळख झाली आहेत. या संक्रमित लोकांना आयजोलेशनमध्ये ठेवले गेले असून १३ संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत.
Henk Bekedam, WHO Representative to India on #Coronavirus: The commitment from Indian govt, the Prime Minister's Office has been enormous, very impressive. It is one of the reasons why India is still doing quite well. I am very impressed that everyone has been mobilised. pic.twitter.com/RtNSMTsiag
— ANI (@ANI) March 17, 2020
आणि केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारने कोरोना व्हायरसची संक्रमण थांबवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले आहेत. व्हायरससोबत लढण्यासाठी भारत सरकारकडून उचलल्या गेलेल्या पाऊलाचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. भारतात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी हेंक बेकडाम हे म्हणाले की, “कोरोना व्हायरसपासून बचावासाठी उच्च स्तरावर खासकरून पंतप्रधान कार्यालयाकडून ज्या प्रकारे तत्परता आणि वेग दाखवला जात आहे, हे अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रभावशाली आहे.
याच कारणामुळे कोरोना व्हायरसशी लढायला भारत खूप चांगले करत आहे. मला हे पाहून खूप आनंद होत आहे कि या मार्गाने सगळे लोकं चालले आहेत.” राष्ट्रीय चिकित्सा व संशोधन परिषदेच्या बैठकीत सहभाग घेतल्यानंतर हेंक यांनी मीडियासोबत संवाद साधत असताना ते बोलत होते. ते म्हणाले “भारतात खासकरून आयसीएमआर आणि आरोग्य संशोधन विभागात अनके चांगल्या सुविधा आहेत. ही संस्था व्हायरसला आयजोलेशन करण्यात सक्षम आहे, आता भारतही रिसर्च समुदायाचा हिस्सा बनून राहील.”