मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना त्यात त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन फौजदारी गुन्ह्यांच्या प्रकरणाची माहिती लपवल्याचा आरोप आहे. पण त्यांना आता न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांच्या पुनर्विचार याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणीच्या मागणीसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या प्रकरणाची सुनावणी खुल्या न्यायालयात होणार आहे.
२०१४ च्या निवडणुकीत न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जामध्ये दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी न्यायालयाला सुनावणी पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले होते. पण फडणवीस यांची पुनर्विचार याचिका खुल्या न्यायालयात सुनावणी करण्यास न्यायालय तयार झाले आहे. नागपूर पोलिसांनी मागील वर्षी फडणवीसांना समन्सही पाठवले होते. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा हे प्रकरण समोर आल्याची माहिती मिळत आहे.
मॅजिस्ट्रेट न्यायालयाने १ नोव्हेंबरला एका अर्जावर सुनावणी केली ज्यात कथित रूपात खुलासा न करण्यासाठी भाजप नेत्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली होती. ही मागणी वकील सतीश उके यांनी न्यायालयात एक अर्ज दाखल करून मागणी केली होती.