नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभे पूर्वी एकमेकांवर प्रखर टीका करणारे शिवसेना भाजप एकत्र लढले आणि भरघोस यशही मिळवले परंतु शिवसेना भाजप वर टीका करण्याची कुठलीच संधी सोडत नाही शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. लोकसभा नव्याने अस्तित्वात आली आहे. राम मंदिराच्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात व्हायला हवी पण जर असं झालं नाही, तर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत NDA प्रणित भाजपने भरगोस मतं मिळवत जवळपास ३५० चा आकडा पार केला आहे. त्यात शिवसेनेला भाजप नंतर सर्वात जास्त म्हणजे १८ जागा मिळाल्या त्यामुळे राम मंदिर पुनर्निर्माणासाठी आणखी काय हवं आहे, तरीही यंदाच्या पाच वर्षात राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि येणारी लोकसभाही याच मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नसल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे. यंदाच्या लोकसभेत भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा दावा आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: I feel this time around Ram temple's construction will start because if we don't, the country will stop trusting us. Now BJP has 303 MPs, Shiv Sena has 18, NDA has more than 350, what more is needed to construct the temple? pic.twitter.com/GtMGGlc5qy
— ANI (@ANI) June 6, 2019