नागपुर : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे की, पैशांची कोणतीही कमतरता नाही, जी कमतरता आहे ती सरकारमध्ये काम करणार्यांच्या मानसिकतेत आहे, ज्यांची वृत्ती नकारात्मक आहे, निर्णय घेण्यासाठी जी हिम्मत हवी ती नाही. गडकरी यांनी एका कार्यक्रमात आयएएस अधिकार्यांवरून राज्यातील सरकारवर निशाणा साधला. नितिन गडकरी यांनी विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थेच्या हिरक जयंतीच्या उद्घाटन सोहळ्यात म्हटले की, बघा, मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो, पैशाची कमतरता अजिबात नाही, नकारात्मक वृत्तीमुळे जे निर्णय घ्यायचे असतात ते घेण्याची हिम्मत नाही.
गडकरी म्हणाले, मी परवा एका मोठ्या व्यासपीठावर होतो, ते बोलत होते की आम्ही हे सुरू करू, ते सुरू करू, तेव्हा मी म्हटले तुम्ही काय सुरू करणार ? तुमची सुरू करण्याची ताकद असती तर तुम्ही आयएएस अधिकारी होऊन येथे नोकरी का केली असती ? तुम्ही कोणता तरी मोठा उद्योग सुरू करू शकत होतात, हे करणे तुमचे काम नाही, जो करू शकतो त्याची तुम्ही जास्तीत जास्त मदत करा, तुम्ही या वादात पडू नका. वुई आर ओन्ली फॅसिलिटेटर. नितिन गडकरी या कार्यक्रमानंतर नागपुरमधील छत्रपती नगरच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळताना दिसून आले. याशिवाय शहरातील इतर अनेक मैदानावर जाऊन त्यांनी खेळाडूंची भेट घेतली. सध्या राज्यात खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. यामुळे गडकरी खेळाडूंना समर्थन करण्यासाठी मैदानात पोहोचले होते.
5 Trillion Economy वर बोलले गडकरी – लक्ष्य अवघड पण अशक्य नाही
गडकरी यांनी शनिवारी म्हटले की, 2024 पर्यंत देशाला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य अवघड आहे, पण अशक्य नाही. त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, घरगुती उत्पादन वाढवून आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करून हे लक्ष्य साध्य करता येऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 पर्यंत देशाला पाच हजार अरब डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या स्वप्नाबाबत अनेक ठिकाणी बोलले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनीही यावर अनेकदा भाष्य केले आहे.
Visit : bahujannama.com