नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यावरून वादात सापडलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे मागितले आहेत. ते म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकची कोणतीही आकडेवारी नाही किंवा कोणतीही छायाचित्रे नाहीत, केवळ माध्यमांमध्ये आवाज आहे. सीएम कमलनाथ यांनी पुन्हा सर्जिकल स्ट्राइकबाबत पुरावे मागितले, ते म्हणाले, ‘कोणतीही आकडेवारी किंवा छायाचित्रे नाहीत, फक्त मीडियाचा आवाज आहे. आमची सेना, हवाई दल कोणतेही बनावट काम करत नाही, परंतु माहिती तरी द्या.
यापूर्वी कमलनाथ म्हणाले होते की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 90 हजार पाकिस्तानी सैनिकांना आत्मसमर्पण करायला लावले होते. याबद्दल कोणीही बोलत नाही. हे म्हणतात कि आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले. कोणता सर्जिकल स्ट्राइक ? सर्जिकल स्ट्राइक कसा केला ? याबद्दल देशाला काहीतरी सांगा.
पीएम मोदी यांच्यावर साधला निशाणा
ते म्हणाले की, हे राष्ट्रवादाबद्दल बोलतात, त्यांच्या पक्षात असे कोणी आहे का की ज्याने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला असेल ? देशातील बेरोजगारीचा संदर्भ देताना कमलनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार आणि शेतकर्यांच्या हिताबद्दल बोलत नाहीत. मी तुम्हाला विचारतो की मोदीजी गेल्या सहा महिन्यांत तरुणांबद्दल काय बोलले ? शेतकरी हिताबद्दल काही बोलले का ?’ असा सवाल कमलनाथ यांनी उपस्थित केला आहे.