सोलापूर न्युज (Solapur News) : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि ओबीसी राजकीय आरक्षण (OBC political reservation) या मुद्दयावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस टीकाटिपणी करत आहेत. तर मराठा आरक्षण (Maratha reservation) मुद्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सवाल केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे हॉटेल व पान वाल्यांचे प्रश्न सोडवू शकतात. त्यांना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मनात आणलं तर ते काहीही करु शकतात, असं त्यांच्या बाबतीत आजही म्हटलं जातं. पण स्वत: मराठा असतानाही ते मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर इतके असंवेदनशील आणि उदासीन का? असा सवाल नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केलाय. यावेळी ते सोमवारी पंढरपूर येथे बोलत होते. (Why Sharad Pawar is indifferent to Maratha reservation issue?)
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले नरेंद्र पाटील ?
नरेंद्र पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीने मराठा समाजाच्या आंदोलनातून काढता पाय घेतल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘शरद पवार (Sharad Pawar) हे भारताचे चाणक्य म्हणून ओळखले जातात. कोणताही प्रश्न ते सहज सोडवू शकतात. पण त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात का लक्ष घातले नाही, याचे कोडे अजून उलघडले नाही. 1999 साली राष्ट्रवादीची (NCP) स्थापना झाली. त्यावेळी मराठ्याचा पक्ष म्हणून पक्षाची ओळख होती. आज ही सत्तेतील राष्ट्रवादीमध्ये बहुतांश मराठा मंत्री आहेत. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे आणि त्यांच्या नेत्यांमध्ये इतकी उदासीनता का आहे? याविषयी आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय. असं नरेंद्र पाटील (Narendra Patil) म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ‘मराठा समाज आरक्षण मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनातून सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदारांनी सोयीस्करपणे काढता पाय घेतला आहे. ते सावलीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मराठा समाजाचं दुर्भाग्य आहे. तर 2017 मध्ये आरक्षणासाठी समाज बांधवांनी 58 मोर्चे काढले. त्या मोर्चामध्ये सत्ताधारी आणि विरोधातील सर्व मराठा समाजातील मंत्री आणि आमदार एकजुटीने सहभागी झाले होते. परंतु, आता सत्ताधारी पक्षातील मराठा आमदार आणि मंत्री आंदोलनात सहभागी होत नाहीत. तरीही जे येतील त्यांना सोबत घेवून आम्ही हे आंदोलनाची लढाई सुरुच ठेवणार आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र पाटील (Narendra Patil) बोलताना पुढे म्हणाले,
‘दोन दिवसापूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी नेत्यांचे लोणावळ्यात चिंतन शिबिर झाले.
या शिबिरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व ओबीसी नेते सहभागी झाले होते.
परंतु, मराठा समाजातील मंत्री आणि आमदार एकत्र येऊ शकत नाहीत.
मराठा समाजातील मंत्री आणि आमदारांनी ओबीसी मंत्री आणि आमदारांना बोध घ्यावा. असं ते म्हणाले.
दरम्यान. ‘येत्या 4 जुलै रोजी मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापुरात राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी सांगितलं आहे.
Web Title :- narendra patil has asked why sharad pawar is indifferent to the maratha reservation issue
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Actor Ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा