नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने खूप तयारी करुन देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण देशात मोठ्या मतधिक्याने पुढे आलेला भाजप पक्ष महाराष्ट्रात मात्र सगळ्यात मागे पडला. दिल्लीच्या निवडणुकांमध्येही भाजपचा पराभव झाला. भाजपच्या या पराभवाचे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितले आहे. एवढेच नाही तर निवडणुकांमध्ये काम करायले हवे असाही सल्ला भाजपला देण्यात आला आहे. दिल्लीमध्ये संघटनेची भाजपने पुनर्रचना करायला हवी. विधानसभा पातळीवरील निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा नेहमीच जिंकू शकत नाही. आरएसएसच्या इंग्रजी मुखपत्र संघटकात छापलेल्या लेखातही भाजपाच्या पराभवाची ही दोन महत्वपुर्ण कारणे नमुद केली गेली आहे.
दिल्लीमध्ये सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे. या काळात भाजप फक्त 3ते 8 जागांवर पोहचू शकला. 2015 च्या निवडणुकीत दिल्लीत भाजपाला 3 जागा मिळाल्या, तर यावेळी त्यांना 8 जागांवर समाधान मानावे लागले. त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागांवर बाजी मारली आणि विजय मिळवला. आरएसएसने आपले मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ मध्ये लिहले की, ‘2015 नंतर भारतीय जनता पक्षाने तळागाळातील पातळीवर पायाभूत सुविधा पुनरुज्जीवित करण्यात आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर प्रसिद्धी घेण्यात अपयशी ठरले. लढलेल्या निवडणूकीत अपयशाची दोन मोठी कारणे होती. त्यात पुढे म्हटले आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा विधानसभा स्तरावरील निवडणुकीत नेहमीच मदत करू शकत नाही आणि दिल्लीमध्ये संघटनेची पुनर्रचना करण्याशिवाय पर्याय नाही.’
भाजपला गेल्या वर्षभरात सर्वच निवडणुकांमध्ये मोठा धक्का बसला आहे. अनेक निवडणुकांच्या प्रचारात भाजप नेते ‘द्वेषपूर्ण घोषणा’ देताना दिसले आहे. यामध्ये अनेक केंद्रिय मंत्री सहभागी झाले होते. यावेळी ‘देशद्रोह्यांना गोळ्या घाला’, आणि केजरीवाल यांना ‘दहशतवादी’ असेही म्हणण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर काही महिन्यानंतरच दिल्ली निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवानंतर गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, ‘ ‘गोळ्या घाला’ आणि ‘भारत-पाक सामना’ सारख्या विधानांना टाळणे गरजेचे होते. पक्ष अशा वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवतो. पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषपूर्ण विधानांमुळे निवडणुकीत भाजपाला त्रास सहन करावा लागला. आम्ही केवळ जिंकण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी निवडणुक लढवत नाही. अनेक पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी निवडणुका असतात. यावेळी दिल्ली निवडणुकांबाबतचे माझे मूल्यांकन चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.’