गेल्या १५ वर्षांपासून नांदेड-देगलूर-बिदर या रेल्वे मार्गासाठी मागणी करण्यात आली होती. दक्षिण व उत्तरेला जोडणारा हा जवळचा व सर्व समावेशक रेल्वे मार्ग असणार आहे. २००३ मध्ये या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. परंतु, रेल्वे बोर्डाने या मार्गाला मंजुरी दिली नव्हती. त्यानंतर पुन्हा चार वर्षाने रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करून हा रेल्वे मार्ग प्रतिक्षेत होता. बिदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी यासाठी रेल्वे मंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेऊन या मार्गासाठी मंजुरी मिळवून घेतली.
नांदेड-देगलूर-बिदर या १५५ कि. मी. च्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, मराठवाड्यासाठी नव्हे तर दोन दिशेला असलेल्या अनेक मोठमोठ्या रेल्वे स्थानकांना यामुळे गती मिळणार आहे. या रेल्वे मार्गासाठी २ हजार १५५ कोटी रुपयांचा अंदाजीत खर्चही मंजूर झाला आहे. नांदेडसाठी ही खूप मोठी भेट मानली जात आहे. मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीने हा मार्ग दुहेरी करावा, अशी मागणी केली असून यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शंतनु डोईफोडे (प्रजावाणी) यांनी दिले आहे.
मराठवाडा जनता विकास परिषदेनेही यासाठी पाठपुरावा केला होता. दक्षिण व उत्तर राज्यांना जोडणारा हा जवळचा मार्ग रेल्वे बोर्डाचेही खर्च कमी करणारा आहे. यामुळे इंधनातही बचत होऊन दळणवळणासाठी मोठा मार्ग उपलब्ध होणार आहे. दहा वर्षापूर्वीच हा मार्ग झाला असता तर, नांदेडचा व मराठवाड्याचा मोठा विकास झाला असता, जेणेकरून अनेकांना रोजगारही मिळाला असता व रेल्वे बोर्डाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न झाले असते. अशी चर्चा नांदेड शहरात सुरू आहे.
गेल्या १५ वर्षांपासून नांदेड-देगलूर-बिदर या रेल्वे मार्गासाठी मागणी करण्यात आली होती. दक्षिण व उत्तरेला जोडणारा हा जवळचा व सर्व समावेशक रेल्वे मार्ग असणार आहे. २००३ मध्ये या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. परंतु, रेल्वे बोर्डाने या मार्गाला मंजुरी दिली नव्हती. त्यानंतर पुन्हा चार वर्षाने रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करून हा रेल्वे मार्ग प्रतिक्षेत होता. बिदरचे खा. भगवंत खुब्बा यांनी यासाठी रेल्वे मंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेऊन या मार्गासाठी मंजुरी मिळवून घेतली.
नांदेड-देगलूर-बिदर या १५५ कि. मी. च्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, मराठवाड्यासाठी नव्हे तर दोन दिशेला असलेल्या अनेक मोठमोठ्या रेल्वे स्थानकांना यामुळे गती मिळणार आहे. या रेल्वे मार्गासाठी २ हजार १५५ कोटी रुपयांचा अंदाजीत खर्चही मंजूर झाला आहे. नांदेडसाठी ही खूप मोठी भेट मानली जात आहे. मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीने हा मार्ग दुहेरी करावा, अशी मागणी केली असून यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शंतनु डोईफोडे (प्रजावाणी) यांनी दिले आहे.
मराठवाडा जनता विकास परिषदेनेही यासाठी पाठपुरावा केला होता. दक्षिण व उत्तर राज्यांना जोडणारा हा जवळचा मार्ग रेल्वे बोर्डाचेही खर्च कमी करणारा आहे. यामुळे इंधनातही बचत होऊन दळणवळणासाठी मोठा मार्ग उपलब्ध होणार आहे. दहा वर्षापूर्वीच हा मार्ग झाला असता तर, नांदेडचा व मराठवाड्याचा मोठा विकास झाला असता, जेणेकरून अनेकांना रोजगारही मिळाला असता व रेल्वे बोर्डाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न झाले असते. अशी चर्चा नांदेड शहरात सुरू आहे.