बहुजननामा ऑनलाईन- बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोकांनी ज्या तरुणाचे अंत्यसंस्कार केले तो तरुण घरी आला. सुरवातीला त्याला पाहताच लोक घाबरले. पण नंतर तरुणाने घडलेला प्रकार सांगितल्यावर लोकांना फार आनंद झाला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक त्याचे श्राद्ध घालण्याच्या तयारी करत असताना तो घरी आल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुशहरी पोलिस स्टेशन परिसरातील बुधनगरा गावची आहे. बुधनगरा येथील सेवानिवृत्त सैनिक रामसेवक ठाकूर यांचा मुलगा संजीव कुमार २५ ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाला. बरीच शोधाशोध करुनही तो कोणालाही सापडला नाही. अशा परिस्थितीत ३० ऑगस्ट रोजी कुटूंबाने त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार मुशहरी पोलिस ठाण्यात नोंदविली दरम्यान, मीनापुरात पोलीसांना पाण्यात पडलेला मृतदेह आढळला.
पोलीसांनी कळविताच त्याच्या नातेवाईकांनी एसकेएमसीएचमध्ये जाऊन मृतदेहाची ओळख पटवून घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यादरम्यान बुधवारी संजीव अचानक गावात पोहोचला. संजीवला पाहताच पालक आणि त्याचे नातेवाईक खूप खूश झाले. संजीव २५ ऑगस्ट रोजी काहीही न सांगता घराबाहेर पडला होता. संजीवच्या वडिलांनी सांगितले की, रुग्णालयातील मृतदेह संजीव सारखाच होता, त्यामुळे ते संजीवची ओळख करण्यात त्यांची चुक झाली. तसेच मुशहरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यानी सध्या संजीवचे १६४ जबाब नोंदविण्यात आले आहेत.