पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Mumbai- Pune Expressway Accident | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. कारनं ट्रकला पाठिमागून धडक दिल्याने कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. कार मुंबईहून पुण्याकडे येत होती. उर्से टोल नाक्याजवळ (Urse Toll) कारने ट्रकला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी आढे गावच्या हद्दीत किलोमीटर 82 जवळ झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार (एमएच 04 जे एम 5349) ही किलोमीटर 82 जवळ समोर जाणाऱा ट्रक (आरजे 09 जेबी 3638) ला मागून जोरात धडकली. यामध्ये कार अर्धी ट्रकच्या मागील बाजूने ट्रकखाली गेली. चालकासह दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी (IRB) पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलिसांनी
(Highway Police) घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करत कार मधील सर्वांना बाहेर काढले.
अपघातात मृत्यू झालेल्या तिघांपैकी एकाची ओळख पटली आहे.
विजय विश्वनाथ खैर (रा. सातारा) असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून इतर दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Mumbai- Pune Expressway Accident | fatal car accident on mumbai pune expressway three people died on the spot
हे देखील वाचा :