मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Mumbai Police | एखादी वस्तू, पासपोर्ट (Passport), चेकबुक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (driving license) गहाळ झाल्यानंतर (missing) मोठी अडचण निर्माण होते. एखाद्या चुकीच्या माणसाच्या हातात या वस्तू पडल्यातर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या वस्तू आपण काळजीपूर्वक जपून ठेवतो. तरीही कधी कधी या वस्तू गहाळ होतात. वस्तू हरवल्यानंतर ती वस्तू पुन्हा मिळवण्यासाठी मोठे सोपस्कार करावे लागतात. नव्याने वस्तू मिळवण्यासाठी वस्तू गहाळ झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात (police station) देऊन एफआयआरची (Mumbai Police) कॉपी मिळवणे गरजेचे असते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एखाद्याची वस्तू गहाळ झाल्यानंतर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी गेल्यानंतर संबंधीत व्यक्तीची पोलिसांकडून अडवणूक केली जाते.
पासपोर्ट, चेक बुक, ड्रायव्हिंग लायसन्स या सारख्या वस्तू हरवल्यावर त्याचे अॅफिडेव्हिट (Affidavit) तक्रारदाराला आणण्यास (demand) सांगितले जाते.
त्यासाठी तक्रारदाराला न्यायालयात (Court) जाऊन अॅफिडेव्हिट नोटरी (Notary) करुन आणावे लागते. वस्तु परत मिळवण्यासाठी तक्रारदाराचा वेळ तर वाया जातोच शिवाय नोटरी करण्यासाठी पैसे देखील मोजावे लागतात.
मात्र, तुम्हाला जर सांगितले की, पोलीस कायद्यामध्ये (police law) अशा प्रकारे शपथपत्र घेण्याची तरतूदच नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale)
यांनी अशा प्रकरणांची दखल घेत गुरुवारी (दि.26) एक पत्रक जारी केले आहे.
यामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या शपथपत्राची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये (circular) म्हटले आहे की,
तक्रारदार पोलीस ठाण्यात एखादी वस्तू किंवा पारपत्र, चेकबुक, परवाना प्रमाणपत्र यासरखे तत्सम महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्यावर तक्रार देण्यास येतात.
तेव्हा ड्यूटीवरील ठाणे अंमलदार तक्रारदारांना अशा वस्तू गहाळ झाल्याबाबत नोटरी कडून शपथपत्र करून आणण्यास सांगतात. त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार देतात.
ही बाब बेकायदेशीर (Illegal) व आक्षेपार्ह आहे. गहाळ झालेल्या वस्तू अथवा कागदपत्राबाबत शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही.
तरीही पोलिसांकडून अशा शपथपत्राची मागणी केली जाते आणि तक्रारदाराची अडवणूक केली जाते.
एखादी व्यक्ती पोलीस ठाण्यात वस्तू किंवा दस्तऐवज गहाळ झाल्याबाबत तक्रार देण्यास आली तर त्याच्याकडून गहाळ झालेल्या वस्तू अगर कागदपत्राबाबत गहाळ प्रमाणपत्र देण्याकरता शपथपत्राची मागणी करु नये.
असे झाल्याचे यापुढे निदर्शनास आल्यास याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई (Legal action) करण्यात येईल, असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे समजा तुमची एखादी वस्तू भविष्यात हरवली तर पोलीस ठाण्यात शपथपत्र देण्याची गरज नाही.
विना शपथपत्र तुम्ही तक्रार दाखल करु शकता.
Web Title : Mumbai Police | An affidavit is not required when reporting a missing item to the police station, action will be taken if requested
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस कोसळणार; 11 जिल्ह्यांना Alert
Pune Accident | भाजीपाला घेऊन जाणार्या रिक्षाचालकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू