मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मनसेने घुसखोरी केलेल्यांच्या विरोधात काढलेल्या मोर्चाचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसत असून विरार येथील अर्नाळा येथे २३ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने आणि मानवी तस्करी पथकाने ही कारवाई केली असून मानवी तस्करी विरोधी विभागाच्या पालघर शाखेला अर्नाळमध्ये बांगलादेशी नागरिक अवैधपणे राहत असल्याचे समजले होते.
ते कळताच याच विभागाच्या पालघर शाखेने महेश गोसावी, पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे आणि दहशतवादी विऱोडजी पथकाचे मानसिंग पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने ही कारवाई केली. त्यात २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यात आठ महिलांचाही सहभाग आहे. तसेच मानवी तस्करी विरोधी विभागाने आणि दहशतवादी विरोधी पथकाने कळंब आणि अर्नाळा परिसरात मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास छापेमारी करताना काही बांग्लादेशींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्या सर्वांना पकडण्यात यश आले असून त्यांना ताब्यातही घेतले आहे. पहाटे ४ वाजता अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी पंच म्हणून काम पाहिले.
या दोन्ही पथकांनी बांगलादेशींची चौकशी केली असताना कुणालाही संशय येऊ नये म्हणून या बांगलादेशींनी मराठी भाषाही अवगत केल्याचे आढळून आले. तसेच हे सर्वजण भंगारचा व्यवसाय आणि मोलमजुरी करत असल्याचेही समजले आहे.