मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राज्य शासनाच्या ‘मेगा भरती’चा मार्ग अखेर मोकळा झालाय. लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती. मात्र मराठा आरक्षण विधेयकामुळे त्या निर्णयाला राज्य सरकारला स्थगिती द्यावी लागली होती. मराठा आरक्षण सुधारणा विधेयकावर बुधवारी राज्यपालांची सही झाली आणि राजपत्र झालं जाहीर झालं. त्यानंतर मेगा भरतीचा मार्ग मोकळा झालाय.त्यामुळे शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे.
मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षणाचा कायदा १ जुलैपासून लागू होणार आहे. आठवड्याभरात पहिल्या टप्प्य़ाच्या नोकरभरतीलाही सुरुवात होणार आहे. आतापर्यंत साधारण २० हजार जागांसाठी जाहिराती निघाल्या आहेत. तर उर्वरित विभागांमधील रिक्त पदांसाठी लवकरच जाहिराती निघणार आहेत.राज्यात विविध विभागांमध्ये तब्बल ७२ हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती.
कोणत्या विभागात किती पदांसाठी होणार भरती ?
ग्रामविकास विभाग – १३,००० पदे
कृषी – १५८५ पदे
वन संरक्षक – १५०० पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग – ४३५ पदे
जलसंधारण – २५० पदे
आरोग्य – ८०० पदे
वित्त (ऑडिट) – ९५९ पदे