बहुजननामा ऑनलाईन टीम –शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा आणि त्यांचे स्टेटमेंट भाजपाला चांगलेच टोचले आहे. संजय राऊत यांना वेड लागल्यामुळे त्यांच्या वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्याची गरज असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
दानवे यांनी राजकीय घडामोडींवर पत्रकार परिषदा घेऊन भाजपाची भूमिका जाहीर केली. अजित पवार यांच्याकडे अजूनही व्हीप बजावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भाजपा बहुमत सिद्ध करेल आणि सरकार पुढील ५ वर्षापर्यंत स्थिरपणे कामकाज करेल, असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. अजित पवारांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राज्यात एक खळबळ उडाली आहे. यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टिकात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
२० प्रमुख मंत्रालय आणि अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांची भाजपाने ऑफर देऊन आपल्याकडे वळवल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे, असे विधान राऊक यांनी केले आहे. यानंतर दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन यांच्या विधानाचे खंडन करुन राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.