मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. देशात नव्यानं सापडणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण आहेत. यामुळं आता केंद्रीय आरोग्य यंत्रणेसोबतच राज्यातील आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे हॉटेल, उपहारगृह, आणि मॉल प्रतिनिधींसोबत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी कळकळीचं आवाहन करताना कडक निर्बंधांबाबत देखील इशारा दिला.
नेमकं काय म्हणाले सीएम ठाकरे ?
मुख्यमंत्र्यांच्या या ऑनलाईन भेटीबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. याबाबत ट्विटरवरून माहिती समोर आली आहे. यात लिहिलंय की, कोविडचा वाढता संसर्ग कसा रोखता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल, उपहारगृहांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच राज्यातल्या कोरोनासंदर्भातील निर्बंधाविषयी ते म्हणाले, लॉकडाऊन लागू करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे. पण मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं अशा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आम्हाला कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका.
कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. आज त्यांनी हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. pic.twitter.com/dVCfSS5xvl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 13, 2021
आजच्या राज्यातील कोरोनाच्या सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात तब्बल 15 हजार 602 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 88 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना हळूहळू गंभीर होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. प्रशासकीय पातळीवरून वाढत्या कोरोनाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नकोय पण मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असे ते यावेळी म्हणाले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 13, 2021