मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुंबईमधील बीकेसी येथे आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आजपर्यंत ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत गेलो असलो तरी आजही माझे अंतःकरण भगवेच आहे आणि आमचा रंग देखील भगवाच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच सत्कार समारंभ होता जो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.
"मी नवीन जबाबदारी स्वीकारल्यापासून एकही सत्कार स्वीकारला नाही, हा सत्कार मी मुद्दाम स्वीकारला कारण हा सत्कार तुमचा आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/l5RBMKbr4I— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 23, 2020
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधूनच शिवसेनेकडून वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी स्वतः मुख्यमंत्री होईल असे कधीही बाळासाहेबांना वचन दिले नव्हते. पण परिस्थितीमुळे तास निर्णय घ्यावा लागला, असेही ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी मी कधीही भगवा खाली ठेवलेला नाही आणि ठेवणारही नसल्याचे ठाकरे म्हणाले. मी मुख्यमंत्री झालो ही वचनपूर्ती नसून त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे म्हणत पुढील मुख्यमंत्री हा शिवसैनिकच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेने इतर पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केल्याचे भाजपने सेनेवर अनेकदा टीका केली होती, त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले ज्यावेळी तुम्ही २०१४ मध्ये अदृश्य हातांची मदत सत्ता स्थापन करण्यासाठी घेतली होती. तेव्हाच तुम्ही पूर्ण उघडे झाला होतात त्याच काय ? असा प्रश्नही ठाकरे यांनी केला.