मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज थेट मुक्ताईनगर (Muktainagar) येथील एकनाथ खडसे यांच्या घरी गेले. फडणवीस यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज मुक्ताईनगर (Muktainagar) येथे एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याबाबत सुरु असलेल्या चर्चेवर भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिला आहे.
शरद पवार- देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली. पवार-फडणवीस यांच्या भेटीसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज फडणवीस खडसे यांच्या निवासस्थानी पोहोचले. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, तुम्हाला जो प्रश्न पडलाय तोच मलाही पडलाय, नेमकं चाललंय काय ?, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, आपण सगळेच एवढे पॉलिटीसाईज झालोय, की प्रत्येक गोष्टीचे राजकीय अर्थ काढतोय. देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया ताईंना विनंती करुन शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते आजारी असल्याने घरीच आराम करत आहेत. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सध्या त्यांच्या आरोग्याची काळजी असल्याने या परिस्थितीत शरद पवार यांच्यासोबत राजकीय चर्चा करण्याचं धाडसच कोण करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ही सदिच्छा भेट असून या भेटीत फडणवीस यांनी त्यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस केल्याचेही पाटील यांनी सांगितले.
मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंची भेट
जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या पक्ष बांधणीसंदर्भात फडणवीस हे रक्षा खडसे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील आठवड्यात मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या आजी-माजी दहा नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि रक्षा खडसे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र
15 तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला कोरोनाची बाधा; आईची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह
‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या
12 वी परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल