मुंबई बहुजननामा : महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले आहे , त्याच्या सर्वात जात फटका कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना बसला आहे. राज्यातील विविध ठिकाणाहून मदतीचे हाथ पुढे येत आहे. सरकार सोबतच सामाजिक संस्था तसेच सामान्य नागरिक देखील सर्वतोपरी मदत करत आहेत. अनेक लष्कर तुकड्या पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत करत आहेत. त्यात खासदार संभाजी राजे देखील स्वतः पूरग्रस्तांना पाण्यात उतरून मदत करत आहेत , स्वतः त्यांच्या मदतीसाठी सरसावत आहेत, आता संभाजीराजे यांनी पुरग्रस्थांच्या पुनर्वसनासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे हि मदत जाहीर केली.
त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले कि , “महापूरामध्ये अनेक घरं उध्वस्त झाली आहेत, त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी मी माझ्या निधीतून ५ कोटी रुपये महापूरामध्ये प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प केला आहे. मला हे माहित आहे कि , रयतेच्या सेवेसाठी हे काहीच नाही , हि एक सुरुवात आहे, शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे. ”
महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा आणि सांगलीतील कृष्णा नदी दुथडी भरून वाहिल्याने पुराने थैमान घातले आहे. परंतु यामुळे हजारो घरे उध्वस्त झाले. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातुन मदत पुरवली जात आहे, त्यातच खासदार संभाजीराजे यांनी ५ कोटी रुपये मदत निधी जाहीर केला आहे. त्यांनी फक्त आर्थिक मदत न करता स्वतः पुराच्या पाण्यात उतरून पुरग्रस्तांची मदत देखील केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं कार्यालय २४ तास खुलं ठेवले, जेणेकरून मदत लागल्यास जाहीर केलेल्या क्रमांकावरून फोन करण्याचं आवाहन देखील केलं . त्यांनी खासदार निधीतून ५ कोटी रुपयांची मदत देखील जाहीर केली.
माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे. pic.twitter.com/78yiDY8D2D
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 12, 2019