पुणे : बहुजननामा ऑनलाईन – थकीत एफआरपीच्या मागणीसाठी आज प्रहार संघटनेतर्फे प्रमुख बच्चू कडू आज पुण्यात शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.यावेळी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनकडून साखर आयुक्तांना घेरावही घालण्यात आला होता.
साधारणपणे ऊस गेल्यानंतर १४ दिवसात एफआरपीची रक्कम मिळणे बंधनकारक असताना आणि गळीत हंगाम संपून चार महिने झाले तरीही अजून एफआरपीच्या रक्कमे पैकी १५०० कोटी रूपये अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. यात एकूण रक्कम १५०० कोटी तर सोलापूर आणि सातारा जिल्हयातील शेतकऱ्यांचे ६०० कोटी रूपये FRP ची रक्कम कारखानदारांकडून येणे आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही कारखानदारांकडून शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळालेली नाही. येत्या आठ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह मिळावी.तसेच लेखापरिक्षक कोण आहेत ? यासह लेखापरिक्षकांनी माहिती मंजूर अथवा नामंजुर कधी केली, याची सर्व माहिती त्या काराखान्याच्या सभासदांसाठी अथवा ऊस उत्पादकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात यावी.
शेतकऱ्यांना ऊस बिलासह इतर माहिती घरबसल्या मिळावी यासाठी ऍप तयार केले आहे, त्याच्या त्रुटी दूर करून आठ दिवसात तो ऍप चालू करू अशी माहिती आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून दिली होती तो ऍप तातडीने चालू व्हावा, अशा मागण्या प्रहार संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.