नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील डॉ. राजेंद्र भारूड यांनी खूप बिकट परिस्थितीत अभ्यास करून ‘आयएएस’ बनले आहेत. ज्या घरात दारू विकली जात होती, घरात दारुड्यांची गर्दी असेल अशा घरात कोणी अभ्यास करू शकत का ? पण अशा परिस्थितीत डॉ. राजेंद्र भारूड यांनी अभ्यास केला आहे. राजेंद्र यांची गोष्ट त्या लोकांसाठी उदाहरण आहे, जे काही ना काही सुविधेसाठी ओरडत असतात. डॉ. राजेंद्र भारूड यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे आणि कलेक्टर बनले आहेत. त्यांनी अशा परिस्थितीत राहून अभ्यास केला आहे, जिथे शिक्षणाबद्दल बोलणे निरर्थकच आहे.
यासाठी आईला दारू विकावी लागली
राजेंद्र यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी पोटात असताना वडिलांचे निधन झाले. त्यामुळे वडिलांना पाहण्याचे सौभाग्य लाभले नाही. त्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती बिघडली. अशी वेळ आली कि एक वेळचे जेवणही मिळायचे अवघड झाले. आम्ही दहा जण एका लहान झोपडीत राहत होतो. दारिद्र्यामुळे घरातील खर्चही भागवला जात नव्हता. त्यामुळे आईला दारू विकावी लागली. तसेच ते महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजातील असल्याचेही सांगितले. लहानपणापासून मी अनके प्रकारची दुःख पहिली आहेत. माझ्या चारही बाजूंना अज्ञान, अंधविश्वास, गरिबी, बेरोजगारी आणि व्यसन याच गोष्टी होत्या. आई कमलाबा मजदूरी करत होती. १० रुपये मिळायचे. त्याने गरजा पूर्ण होत नव्हत्या. यासाठी आईने देशी दारू विकायला सुरुवात केली.
घराच्या बाहेरील चबुतऱ्यावर बसून केला अभ्यास
सर्दी-खोकला असल्यास औषधाऐवजी दारू मिळायची, असे राजेंद्र यांनी सांगितले. मी चौथीत असताना घराबाहेर बसून अभ्यास केला. पण दारू पिण्यासाठी येणारे लोक काही ना काही काम सांगायचे. मद्यपान करणारे लोकं स्नॅक्सच्या बदल्यात पैसे द्यायचे. त्यातूनच पुस्तके खरेदी घ्यायचो. राजेंद्रने सांगितले की, आपण ९५% गुणांसह 10 वी उत्तीर्ण झालो आहे. १२ वी मध्ये ९०% आणले. यासह ते २००६ मध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी बसले. ओपन मेरिट अंतर्गत मुंबईच्या सेठ जीएस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. २०११ मध्ये महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरलो. त्याच वर्षी यूपीएससीचा फॉर्म भरला आणि जिल्हाधिकारी देखील झाले. तोपर्यंत माझ्या आईला काही माहित नव्हते. जेव्हा गावातील लोक, अधिकारी, नेते त्यांचे अभिनंदन करायला येऊ लागले तेव्हा त्यांना कळले की राजू जिल्हाधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यावर आई फक्त रडली.
लोकं म्हणत होते – मुलगाही दारू विकणार
राजेंद्र यांनी सांगितले की, ‘दारू पिण्यासाठी लोकं घरी यायची तेव्हा म्हणायचे कि अभ्यास करून काय करणार ? आपल्या आईला सांगा कि मुलगाही दारू विकणार आहे. भिल्लाचा मुलगा भिल्लच राहणार. मी ही गोष्ट आईला सांगितली. तेव्हा आईने ठरवले कि मुलाला डॉक्टर-कलेक्टर बनवणार. पण तिला माहित नव्हते कि यूपीएससी काय आहे ? पण, माझा विश्वास आहे की, मी आज जे काही आहे ते फक्त माझ्या आईच्या विश्वासामुळे आहे.’