हातकणंगले : बहुजानानामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांना हातकणंगले मतदारसंघातुन पराभव पत्करावा लागला होता त्यांनतर त्यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हंटले कि, प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर ४५९ मते जास्त मोजली गेली आहेत,’ असा धक्कादायक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगलेमधील पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.याआधी ईव्हीएममध्ये घोटाळा केला जात असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात होता त्यानंतर आता राजू शेट्टी यांनीही याबाबत शंका उपस्थित केली आहे.
ईव्हीएमद्वारे झालेलं मतदान आणि निकालावेळी मोजली गेलेल्या मतांची संख्या यात तफावत असल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे.”हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमद्वारे १२ लाख ४५ हजार ७९७ एवढं मतदान झालं. पण नंतर ईव्हीएममधून १२ लाख ४६ हजार २५६ एवढी मते मोजली गेली. म्हणजे एकूण ४५९ मते जास्त मोजली गेली आहेत. यामध्ये पोस्टलची मते धरलेली नाहीत,” असा आरोप राजू शेट्टी यांनी केले आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हे दोन वेळा खासदार होते मात्र यंदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला. निवडणुकीत हार झाली असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठीचं राजकारण आपण सुरूच ठेवणार आहोत, असं राजू शेट्टी म्हणतात.