लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असून निवडणूक काळात कोणत्याही मुद्दयांवर राजकारण होण्याची शक्यता असते अशातच बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ‘अलवर अत्याचारप्रकरणी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमधील ‘अलवर’ येथे झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी घाणेरडे राजकारण करत आहेत. या प्रकरणी बहुजन समाज पार्टी योग्य राजकीय निर्णय घेईल. तसेच कायदेशीर कारवाई ही करेल, असे मायावती यांनी म्हंटले आहे. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. राजस्थानमध्ये सध्या सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारवरही टीका केली.
यासंदर्भात मायावतींनी मोदी सरकारच्या काळात झालेल्या दलित अत्याचाराच्या घटनांची यादी जाहीर करत या घटनांची जबाबदारी स्वीकारून मोदींनी राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केली आहे. बहुजन समाज पार्टी योग्यवेळी योग्य तो राजकीय निर्णय लवकरच घेईल मात्र उना येथील प्रकरण, रोहित वेमुला प्रकरण याची जबाबदारी मोदी कधी स्वीकारणार, असा सवालही मायावतींनी विचारला आहे.