नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर स्लॅबमध्ये लवकरच बदलता करण्यात येणार असल्याचा इशारा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी दिला. अधिकाधिक पैसे लोकांच्या हातात ठेवून खप वाढवणे हा यामागचा हेतू आहे. कमकुवत खासगी गुंतवणूक आणि मागणीअभावी अर्थव्यवस्था कोलमडली असताना सरकारने हे पाऊल उचलले आहे.
हिंदुस्तान टाईम्स लिटरशिप समिट २०१९ मध्ये अर्थमंत्री म्हणाले की, सरकार बर्याच गोष्टींवर विचार करीत आहे. इनकम टॅक्समध्ये कपात देखील करण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्प २०२० -२०२१ आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये सादर करण्यात येणार आहे.
जीडीपी दर ४. ५ टक्क्यांवर :
महत्त्वाचे गोष्ट म्हणजे सप्टेंबरच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था साडेचार टक्क्यांनी वाढली आहे, जी गेल्या २६ तिमाहीत सर्वात वाईट आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यांत केंद्र सरकारने अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून अनेक मोठी पावले उचलली आहेत.
सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेट करात कपात :
सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कॉर्पोरेट कर कमी करण्याचा निर्णय घेतला ज्याचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर सुमारे १. ४५ लाख कोटी रुपयांवर झाला. गेल्या आठवड्यात झालेल्या चलनविषयक धोरणात भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला.
Visit : bahujannama.com