पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेश भारतापासून वेगळा केला . तसेच पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात अनेक कारगील युद्ध झाले. परंतु, त्यांनी कधी जवानांच्या शौर्यावर किंवा त्यांच्या बलिदानावर मतं मागितले नाही. मात्र मोदीजी तुम्ही पुलवामामधील शहीद जवांनांच्या बलिदानावर खुशाल राजकारण करत आहेत. त्यापेक्षा घरी बसा अशी टीका विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
तुम्ही देशाचे चौकीदार असल्याचे म्हणता. पण लोक आता तुम्हाला ‘चौकीदार चोर’ म्हणत आहेत. उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांच काय झालं याविषयी तुम्ही बोलणे अपेक्षीत होते. परंतु, शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ तुमच्यावर आल्याचे मुंडे म्हणाले.पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावे मते मागताय मोदीजी मी तुमच्या जागी असतो, तर घरी बसलो असतो, परंतु, शहीदांच्या नावे मतं मागितले नसते, असा टोलाही मुंडे यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलतना मुंडे म्हणाले कि ,मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने अमित शाह यांना अफजल खान संबोधले होते. तसेच मराठी माणसाला अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. मात्र तुम्ही गुजरातमध्ये जावून अफजल खानाला मुजरा करून आल्याची टीका यावेळी मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.