बहुजननामा ऑनलाईन टीम : मोदी सरकारकडून विवाहित जोडप्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारच्या नव्या योजनेनुसार प्रत्येक जोडप्याला पेंशन म्हणून ७२ हजार रुपये दिले जातील. ही योजना व्यापारी आणि स्वयंरोजगार व्यक्तींसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या अंतर्गत सुरू केली आहे. दरम्यान, यासाठी विवाहित लोकांना दरमहा २०० रुपये गुंतवावे लागतील. तरच त्यांना निवृत्तीवेतनाचा हक्क मिळणार आहे. याद्वारे ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पेन्शन मिळणार आहे.
या योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी बँकेत बचत खाते किंवा जनधन खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेस केवळ २ ते ३ मिनिटे लागतात. यासह, रजिस्ट्रेशननुसार मासिक हप्ता निश्चित करण्यात आला आहे, जो ५५ ते २०० रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच, जर एखादी व्यक्ती ३० वर्षांची असेल तर या योजनेनुसार त्याला दरमहा १०० रुपये गुंतवावे लागतील. म्हणजे वर्षासाठी १२०० रुपये. अशा प्रकारे त्याला एकूण ३६,००० रुपये जमा करावे लागतील.
यानंतर त्या व्यक्तीचे वय ६० वर्ष झाल्यावर त्याला दरमहा ३००० रुपये मिळतील आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदारास अर्ध्या पेन्शन म्हणजेच महिन्याला १५०० रुपये मिळतील. जर पती-पत्नी दोघेही या योजनेस पात्र असतील तर दोघेही त्यात भाग घेऊ शकतात. त्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी दोघांना दरमहा ६ हजार रुपये मिळतील, म्हणजे त्यांना वार्षिक ७२००० रुपये पेन्शन मिळेल. या योजनेमुळे ज्यांना वार्षिक उलाढाल १.५ कोटींपेक्षा कमी आहे अशा लोकांना देखील याचा फायदा होऊ शकेल, यात १८ ते ४० वर्षांतील सर्व दुकानदार, किरकोळ व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
Visit : bahujannama.com