नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा गरीब आणि ज्येष्ठ लोकांचा विचार करून मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने अशा लोकांसाठी 3000 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली आहे, ज्यासाठी आतापर्यंत सुमारे 45 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केले आहे.
केंद्र सरकारने अशा लोकांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजनेची सुरुवात केली आहे, ज्यामध्ये असंगठित क्षेत्रात काम करणार्या मजूरांना 60 वर्षांचे वय पूर्ण केल्यानंतर 3000 रुपये महिना किमान पेन्शन देणार आहे. सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना सुरू केली होती.
या योजनेंतर्गत 4 मार्च, 2021 पर्यंत सुमारे 44.90 लाख मजूरांनी आपले रजिस्ट्रेशन केले आहे. या योजनेत 18-40 वर्षाचे असे मजूर सहभागी होऊ शकतात, ज्यांचे महिन्याचे उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
किती मिळेल पेन्शन
या योजनेनुसार 55 रुपयांपासून 200 रुपये महिना गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये 18 वर्षाच्या वयाच्या लोकांना दर महिन्याला 55 रुपये आणि 30 वर्षाच्या वयातील लोकांना 100 रुपये, तर 40 वर्षाच्या वयाच्या लोकांना 200 रुपये महिना द्यावे लागतील.
जर एखाद्या मजूराने 18 वर्षाच्या वयात योजनेत रजिस्ट्रेशन केले असेल तर त्यास अवघ्या एक वर्षात 660 रुपये जमा करावे लागतील. त्या मजूराला 60 वर्षाच्या वयापर्यंत 27,720 रुपये गुंतवावे लागतील. मजूराला 42 वर्षापर्यंत पैसे गुंतवावे लागतील. 60 वर्ष वय झाल्यानंतर 3,000 रुपये दर महिना मिळतील.
भारत सरकारची ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून चालवली जात आहे, यासाठी पेन्शनसुद्धा एलआयसी देईल.
असे करा रजिस्ट्रेशन
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी मजूराला आधार कार्ड, बँक खाते पासबुक घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपले खाते उघडावे लागेल. खाते उघडल्यानंतर मजूराला श्रम योगी कार्ड जारी केले जाईल. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1800-267-6888 वर संपर्क करू शकता.