बहुजननामा ऑनलाईन टीम : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आता मोठे बदल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे बदलत्या नियमांमुळे आता यापुढे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या रँकनुसार नाही तर त्यांच्या नेतृत्वगुणांनुसार आणि अन्य क्षमतांच्या आधारावर त्यांचे कॅडर नक्की केले जाणार असून आता त्यानुसार पद ठरणार आहे.
मोदी सरकार परीक्षा पॅटर्नमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणार आहे. पंतप्रधान मोदींनी या संदर्भात डीओपीटीला माहिती मागितली आहे. सध्या याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अनेक वर्ष सुरु असलेली जुनी पद्धत सरकार बदलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांच्या रँकप्रमाणेच त्यांच्या कौश्यल्याचा देखील विचार केला जाणार आहे, अशी माहिती डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगने दिली आहे.
सध्या उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या रँकनुसार पद दिले जाते. परंतु आता या नवीन नियमांमुळे ट्रेनिंगमध्ये उत्तम कामगिरी उमेदवारांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बदल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती . काही दिवसांपूर्वी देखील अशाच पद्धतीने पदवाटप करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता सरकारने देखील याच पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले आहे.
Visit : bahujannama.com