नवी दिल्ली : मोदी सरकार (Modi government) दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे. दुसऱ्या पर्वाचं दुसरं वर्ष पूर्ण झालं आहे. आगामी काही दिवसामध्ये पावसाळी अधिवेशन (Rainy Convention)सुरु होणार आहे. मात्र त्याआधी मोदी सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Government Cabinet Expansion) केला जाणार आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल सरकारमधून बाहेर पडलं आहे. त्यामुळे अनेक पदे रिक्त राहिली आहे. तर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात (In the cabinet of Modi government) अनेक भाजपच्या अनेकांना स्थान मिळू शकते. अनेक दिग्गजांना संधी मिळू शकते. तर महाराष्ट्रातील (Maharashtra) देखील काही दिग्गजांना संधी मिळू शकते. तशी नावेही चर्चेत आहेत.
केंद्रात जवळपास 80 मंत्रालयं आहेत.
तर आता साधारण 60 मंत्र्यांकडे या मंत्रालयांचा कार्यभार आहे.
तसेच, अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे अतिरिक्त पदभार देखील आहे.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात दोन वर्ष झाली मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Government Cabinet Expansion) झालेला नाही.
या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील तिघांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
एक म्हणजे राष्ट्रवादीला रामराम करून भाजपचा झेंडा हातात घेतलेले भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसलेंना (Udayan Raje Bhosle) केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.
तसेच पूर्वी शिवसेनेत असणारे सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणेंचं (Narayan Rane) नाव देखील चर्चेत आहे.
त्याचबरोबर बीडच्या लोकसभा खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांचं नाव देखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरु आहे. थोडक्यात त्यांच्याबद्दल जाणून घ्या.
नारायण राणे – (Narayan Rane)
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार आरोपप्रत्यारोप सुरु आहे.
खा. नारायण राणे वारंवार ठाकरे सरकारवर शाब्दिक प्रहार टीकाटिपणी करीत आहेत.
तसेच, आगामी वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक रणधुमाळी होत आहे.
मुंबईची महापालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सर्व ताकद पणाला लावलीय.
नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.
उदयनराजे भोसले – (Udayan Raje Bhosle)
राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
म्हणून 2019 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे ही निवडणूक गाजली.
या निवडणुकीत उदयनराजेंना हार पत्करावी लागली.
नंतर लगेच भाजपनं त्यांना राज्यसभेवर संधी दिली.
चष्म्यामुळं चेहर्यावर पडलेले डाग ‘या’ 5 मार्गाने करा दूर, जाणून घ्या
‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
फक्त १० मिनीटात असे वाढवा ‘ब्लड सर्कुलेशन’, ‘ही’ आहे सोपी पद्धत
या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
web title: Will these ‘veterans’ get a chance in Modi’s cabinet? 3 names from Maharashtra under discussion