नवी दिल्ली वृत्तसंस्था : स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान कुटुंब पद्धतीचा संदेश दिला . त्यांच्या या आव्हानानंतर ओवेसी यांनी मोदींना धारेवर धरले आहे. युवा संख्येच्या क्रयशक्तीचं महत्त्व मोदींना माहित नाही, ते स्वत:च्या जबाबदारीतुन पळ काढत आहेत अशी टीका ओवेसींनी केली आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, त्याला आळा घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. छोटे कुटुंब असणं हीच खरी देशभक्ती आहे , असं विधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र दिनादिवशी (गुरुवारी )केलं. त्यांच्या याच वक्तव्यावर ओवेसींनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले कि, ‘ देशातील सध्याची तरुणांची लोकसंख्या २०४० पासून उत्पादन क्षम असणार आहे. तेव्हा या जनतेचा योग्य प्रकारे वापर कसा करून घ्यायचा हे पंतप्रधानांना माहित नाही. त्यामुळे सुशासनाच्या जुन्या आणि निरुपयोगी कल्पना ते घेऊन येत आहेत आणि स्वत:च्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत’.
ओवेसी यांनी ह्या आधी देखील सरकारच्या अनेक धोरणांविषयी विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे जे पी नड्डांसोबत इतर भाजपातील अनेक नेत्यांनी मोदींच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. मोदींचं भाषण अत्यंत प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.