मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government ) कोलमडले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. तेव्हापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. त्यात आता सामनातून महाराष्ट्र सरकारची जाहिरात करण्यात आली आहे. यावरुन मनसेने (MNS) शिवसेनेवर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घणाघाती टीका केली आहे. तसेच या जाहिरातीवरुन मनसेने (MNS) ठाकरे गटाला खोचक सवाल विचारला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पैसा झाला मोठा !! pic.twitter.com/uqrYW8OJ7P
— Avinash Abhyankar (@AviAbhyankarMNS) November 3, 2022
‘खोके सामनामध्ये पोहोचले का?’ असा सवालच मनसेकडून (MNS) करण्यात आला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे सरकारची जाहिरात सामानात छापून आल्याने त्यावरुन निशाणा साधण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी या जाहिरातीवरुन ठाकरे गटाला टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत ट्विट केलं आहे. ‘खोके सामनामध्ये पोहोचले का?’ असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
५० खोके सामना "OK " pic.twitter.com/EM5q2l04BO
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 3, 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सामनाच्या पहिल्या पानावर माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून (Public Relations Department) एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण छापण्यात आले आहे. तसेच या जाहिरातीमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांचंही नाव आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
Web Title :- MNS | mns sandeep deshpande slams shivsena uddhav balasaheb thackeray over saamana
हे देखील वाचा :
Bachchu Kadu | फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू म्हणाले – ‘मला वाद वाढवायचा नाही, कडू-राणा वादावर…’