बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक, आणि गुजरात या राज्यात कोरोना (COVID-19) नाही, फक्त महाराष्ट्रातच कोरोना का वाढतोय असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. राज्यात आणि देशात कोरोना वाढत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावले जात आहेत. काही ठिकाणी तर लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली आहे. याला मनसे विरोध करताना दिसत आहे. महाराष्ट्रातच कोरोना का वाढतोय असा सवालही मनसेनं केला आहे.
‘राज्य सरकारकडून कोरोनाचा बाऊ केला जात आहे’
मनसेकडून सातत्यानं आरोप केला जात आहे की, राज्य सरकारकडून कोरोनाचा बाऊ केला जात आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकांना भीती घातली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे स्वत: मास्क वापरायच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. राज ठाकरे कुठेही बाहेर जाताना मास्क न लावताच जातात. अनेक कार्यक्रमातही त्यांनी मास्क लावलला नसल्याचं दिसलं आहे.
‘तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येताहेत म्हणून कोरोना वाढतोय का ?’
मनसेनं म्हटलं आहे की, तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येताहेत म्हणून कोरोना वाढतोय का ? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, मग महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय ? सरकारचं कोरोनावर की, कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे. सरकार जर एवढे कडक निर्बंध लावत असेल तर जनतेला काही सवलती देणार का ? असे अनेक सवाल मनेसनं महविकास आघआडीला केला आहे.
‘जनतेनं काम करायचं नाही का ? सरकारनं लोकांना फक्त घाबरवायचं का ?
मनसेनं असंही म्हटलं आहे की, कोरोना रुग्ण संख्या कमी होते तेव्हा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा वरळी पॅटर्न आणि कोरोना रुग्ण वाढले की, लोक जबाबदार. जनतेनं कम करायचं नाही का ? सरकारनं कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायचं का ? असे प्रश्नही मनसेकडून करण्यात आले आहेत.
‘मुंबई नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे’
राज्यात सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case)सध्या खूप गाजताना दिसत आहे. सचिन वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, ज्या पद्धतीनं हे प्रकरण बाहेर आलंय, फक्त मुंबई नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. सरकारला प्रश्न विचारला की, त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार. पोलिसांची प्रतिमा राज्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पूर्ण सत्य बाहेर येऊ द्यात असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.