पुणे : बहुजननामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुका झाल्या, निकाल लागले. आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. येत्या सहा महिन्याक विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यासाठी सर्वच पक्ष आतापासून तयारी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याक राज ठाकरे शाखाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. तशी बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीचे विषेश म्हणजे या बैठकीला येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्यांना बाहेरच आपले फोन ठेवावे लागले आहे. बैठकीतील कोणतीही माहीत प्रसार माध्यमांना मिळू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील अशोकनगर येथे तीन दिवसीय शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. बैठकीसाठी प्रसारमाध्यमांना देखील आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. तसंच बैठकीला येणार्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात आले आहे. बैठकीमधील कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारमाध्यमांना मिळू नये म्हणून थेट राज ठाकरेंनी पगाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
आजपासून तीन दिवस ही बैठक होणार आहे. बैठकीदरम्यान राज ठाकरे मनसैनिकांना काय कानमंत्र देतात, याकडे लक्ष सर्वांचे लक्ष राहणार आहे. विधानसभेच्या निवडणुका सुरु होण्यापूर्वी राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याचे वेळापत्रक समोर येईल.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेने स्वतः मैदानात न उतरात बाहेरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत केली. त्यांची तुफान भाषणे झाली. मात्र आघाडीला निवडणुकीत त्याचा फारसा फायदा झाला नाही, हेच समोर आले. मात्र आता विधानसभेत मनसे काय आणि कशी भुमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.