मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसीवर केंद्रातील मोदी सरकारला राज ठाकरे यांचा पाठींबा मिळाला आहे. मुंबईत मनसेच्या महाअधिवेशनात बोलताना राज ठाकरे यांचे मोदी सरकारबाबत नरमाईचे धोरण दिसून आले. ते म्हणाले, घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयाचे आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याच्या समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये एक मेगा रॅली काढण्यात येणार आहे.
राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही देशात गेलात तर तेथे पासपोर्टबाबत विचारपूस होते, जर पासपोर्ट नसेल तर तुम्हाला परत पाठवले जाते. कोणत्याही देशात तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आमच्या देशात लोक येतात, आणि आम्ही त्यांना आम्ही विसरून जातो. आज आपण अशा स्थितीत आहोत, जसे काही बॉम्बवर बसलो आहोत. राज ठाकरे यांनी घुसखोरांविरूद्ध ठोस भूमिका घेत म्हटले, जर आज युद्ध झाले तर आपल्या लष्कराला देशातच लढावे लागेल. कारण घुसखोर प्रत्येक ठिकाणी आहेत. योग्यवेळी मी मोदींना विरोध केला, जेव्हा चांगले काम केले तेव्हा अभिनंदन सुद्धा केले. कलम 370 हटविल्यानंतर मोदी सरकारचे अभिनंदन मी केले होते.
एनआरसीविरोधातील आंदोलनावर प्रश्न
राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीविरूद्ध होत असलेल्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, अचानक देशभरात सीएएविरूद्ध मोर्चे निघत आहेत. या मोर्चांमध्ये किती भारतीय आहेत. ते घुसखोरांचे समर्थन कसे करू शकतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, आता पक्षाबाबत कुणी सोशल मीडियावर चुकीचे लिहिले तर त्याला पक्षातून बाहेर काढण्यात येईल. पक्षाच्या नव्या झेंड्यावर राजमुद्रा असल्याने त्याचा वापर निवडणुकीदरम्यान करू नका, वेगळा झेंडा वापरा असे ठाकरे म्हणाले.
Visit : bahujannama.com