नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दिली आहे. करियप्पा यांनी बुधवारी (दि. 12) तक्रार दाखल केली आहे.
NSUI ने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील सर्वच जण अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. अशा काळात नागरिकांना आधार देणे आणि त्यांची जबाबदारी घणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, आत्ताचे सरकार यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे NSUI नं गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. सरकार देशाच्या प्रश्नांची उत्तर लवकरात लवकर देईल, अशी अपेक्षा आहे.